दैनिक मुख्य पान  |  मराठी मुख्य पान

गुरुपौर्णिमा विषयक प्रवचन

नमस्कार ! प.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले व त्यांचे गुरु प.पू. श्रीमत् सदगुरु भक्‍तराज महाराज यांना वंदन करून आपण आजच्या विषयाला सुरुवात करूया. आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमाही म्हटले जाते. महर्षी व्यास यांनी ब्रह्मसूत्रे, महाभारत, श्रीमद्भागवतासह अठरा महापुराणे इत्यादी महान रचना केल्या. व्यासांनी लिहिले आहे, त्यापेक्षा नवीन कोणीच सांगू शकणार नाही. म्हणून `व्यासोच्छिष्टं जगत् सर्वम् ।' म्हणजे व्यासांनी वाणीवाटे सर्व ग्रंथ सांगितल्यामुळे एक प्रकारे त्यापुढे लिहिले गेलेले `सर्व ग्रंथ व्यासांचे उच्छिष्ट आहे', असे म्हटले गेले आहे. भूमितीत व्यास म्हणजे वर्तुळातील सर्वांत मोठी आतली रेषा. व्यासांचे वा*्मयही तसेच सर्वांत मोठे आहे. सभेत बोलणारा वक्‍ता ज्यावर उभा रहातो, त्याला व्यासपीठ म्हणतात. व्यासांप्रमाणे त्यालाही त्याच्या विषयाचे परिपूर्ण ज्ञान असावे, अशी अपेक्षा असते. व्यासांच्या महान ग्रंथरचनेमुळे त्यांना आदिगुरु म्हणतात. अशा महर्षि व्यासांचे पुण्यस्मरण म्हणून बहुतेक ठिकाणी गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रथम व्यासपूजा व नंतर गुरुपूजा करतात. जगभरातील सर्वच साधक गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्‍त करण्यासाठी हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात. यानिमित्ताने गुरुपौर्णिमेची माहिती करून घेऊया. सर्वप्रथम आपण गुरुंविषयी माहिती करून घेऊया.

` गुरु ' या शब्दातील `गु'कार म्हणजे अज्ञानरूपी अंध:कार व `रु'कार म्हणजे अंधाराचा नाश करणारे ज्ञानरूपी तेज. म्हणून गुरु म्हणजे `अज्ञानरूपी अंध:कार घालवणारा' अशी गुरु या शब्दाची व्युत्पत्ती आहे. शिष्याचे अज्ञान घालवून त्याला ईश्‍वरप्राप्‍ती व्हावी, यासाठी साधना सांगून ती करवून घेतात व अनुभूती देतात त्यांना गुरु असे म्हणतात. परमोच्च अशा ब्रह्माचे आनंद स्वरूप असे सर्वोच्च सुख देणारे, ज्ञानाचे मूर्तिमंत साकार रूप म्हणजे गुरु होय. गुरु हे आकाशासारखे व्यापक आहेत. तसेच ते शाश्‍वत, शुद्ध व स्थिर अशी सर्वोच्च बद्धीमत्ता असलेले सर्वसाक्षी आहेत. गुरूंना ब्रह्मा, विष्णु व महेश यांची योग्यता बहाल केली आहे; कारण ब्रह्मदेव ज्याप्रमाणे निर्मिती करतो, त्याप्रमाणे गुरु हे एका अज्ञानी माणसाचे रूपांतर एका ज्ञानी व सुसंस्कृत शिष्यात करतात. विष्णु ज्याप्रमाणे रक्षण करतो, त्याप्रमाणे गुरु हे आपल्या शिष्याचे वाईट प्रवृत्तींपासून रक्षण करतात. महेश ज्याप्रमाणे संहार करतो, त्याप्रमाणे गुरु हे शिष्याच्या ठिकाणी उद्भवणार्‍या वाईट विकारांचा व विचारांचा नाश करतात. म्हणून शेवटी गुरूंचा उल्लेख परब्रह्माची उपमा देऊन केला आहे. आता गुरुप्राप्‍ती व्हावी, यासाठी काय करायचे ते आपण पाहूया. समजा, आपल्याला वर्गात वर्गप्रमुख (मॉनिटर) व्हायचे असेल, तर आपण काय करू? तर शिक्षकांची मर्जी संपादन करण्याचा प्रयत्‍न करू. म्हणजेच नियमितपणे अभ्यास करू, वर्गात शिस्तीने वागू, शिक्षकांना अपेक्षित असेल, तसेच करू. त्याचप्रमाणे गुरुप्राप्‍ती व्हावी यासाठी गुरूंचे किंवा एखाद्या अध्यात्मिकदृष्टया उन्नत व्यक्‍तींचे मन जिंकणे आवश्यक असते. गुरुकृपा सातत्याने व्हावी, यासाठी गुरूंचे मन सातत्याने जिंकावे लागते. उन्नत व संत यांना आवडणारी गोष्ट जर कोणती असेल, तर ती म्हणजे `साधना'. गुरुप्राप्‍तीसाठी व सततच्या गुरुकृपेसाठी सातत्याने तीव्र साधना करणे आवश्यक आहे. हीच गुरुकृपायोगानुसार साधना होय. विद्यार्थांसाठी गुरुकृपायोगानुसार साधना कोणती, ते पाहू. या साधनेचा पाया म्हणजे नामजप. ईश्‍वराचे सतत स्मरण करणे याला `नामजप', असे म्हणतात. अनेक देवी-देवतांपैकी आपल्या कुलदेवतेचा नामजप आपल्यासाठी जास्त उपयुक्‍त असतो. ज्यांना फक्‍त कुलदेव असेल त्यांनी कुलदेवाचा व फक्‍त कुलदेवी असेल त्यांनी कुलदेवीचा नामजप करावा. कुलदेव व कुलदेवी दोन्ही असल्यास त्यांनी कुलदेवीचा जप करावा, उदा. कुलदेवी भवानीमाता असल्यास ` श्री भवानीदेव्यै नम:। ' असा नामजप करावा. कुलदेव खंडोबा असल्यास ` श्री खंडोबाय नम:। ' असा जप करावा. कुलदेवता माहित नसल्यास ` श्री कुलदेवतायै नम:। ' असा जप करावा. हिंदूंव्यतिरिक्‍त इतर धर्मियांनी आपआपल्या धर्मानुसार नामजप करावा. नामजपाच्या जोडीला आपल्यामध्ये सद्‌गुण येण्यासाठी आपण काय केले पाहिजे, तर नम्रता, देवाला व वडिलधार्‍यांना नमस्कार, सर्वांप्रती प्रेमभाव, चांगली संगत यासाठी सतत प्रयत्‍न इत्यादी. अशा प्रकारे साधना केल्याने आपल्याकडे गुरुकृपेचा अखंड ओघ येत रहातो. गुरुप्राप्‍तीसाठी शिष्यात कोणते गुण आवश्यक आहेत, ते आत्ता आपण समजून घेऊया. कारण हे गुण अंगी बाणविल्यास जलद गुरुप्राप्‍ती होईल किंवा झाली असल्यास ती टिकवता येईल.


१ तीव्र मुमुक्षत्व किंवा गुरुप्राप्‍तीची तीव्र तळमळ :-
या एका गुणामुळे गुरुप्राप्‍ती लवकर होते व गुरुकृपा सातत्याने रहाते. गुरूंनी मला आपले म्हणावे, त्यांची कृपा व्हावी यासाठी रात्रंदिवस त्याच गोष्टीचा ध्यास धरून ` मी काय केले की, गुरु प्रसन्न होतील, ' या दृष्टीने प्रयत्‍न करणे आवश्यक आहे.

२ आज्ञाधारकपणा :-
हा शिष्याच्या सर्व गुणांचा राजा आहे. मनात कोणताही विकल्प न आणता गुरु म्हणतील तसे सर्व केले की, आपले मन व बुद्धी वापरली जात नाही. बालमित्रांनो, पूर्वीच्या काळी मुले वर्षानुवर्षे गुरूंच्या घरी राहून शिक्षण घेत असत. गुरु त्यांना शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक असे सर्वांगीण शिक्षण देऊन त्यांना एक परिपूर्ण नागरिक बनवत असत. मुलांची क्षमता किती वाढली, हे पहाण्याकरिता गुरु अधूनमधून प्रत्येकाची परीक्षा घेत असत. बर्‍याचदा मुलांना कळायचेही नाही की, गुरूंनी आपली परीक्षा घेतली. परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर गुरूंनी आशीर्वाद दिल्यावरच त्यांना त्याबाबत कळायचे. धौम्यऋषींनी घेतलेल्या परीक्षेत आरुणी कसा उतरतो ते आज आपण पाहूया. धौम्यऋषींच्या आश्रमात आरुणी नावाचा एक अतिशय गुणी विद्यार्थी होता. गुरुजींनी आरुणीला बोलावून सांगितले, ``आपल्या शेतातला बंधारा पावसामुळे वाहून गेला आहे. तो नीट करून शेताला पाणी दे.'' आरुणीने ``हो'' म्हटले आणि तो शेतात गेला. शेत खूप मोठे होते. मनोमन गुरूंना वंदन करून आरुणी चालू लागला. चारही बाजूंनी लक्ष ठेवत तो चालत राहिला. एके ठिकाणी दगडांचा बांध पाण्याच्या प्रवाहाने मोडून गेला होता. त्यामुळे पाणी शेताकडे न वळता सरळ वाहून जात होते. आरुणीने सर्व दगड गोळा करून बांध घालण्याचा प्रयत्‍न केला; पण पाण्याच्या प्रवाहापुढे तो काही टिकला नाही. आरुणीने पुन्हा बांध घातला, तर पुन्हा तो मोडला. आरुणी वारंवार प्रयत्‍न करून थकला. अखेर तो गुरूंना शरण गेला. `आता मीच या बांधाच्या जागी झोपतो; पण हे पाणी थांबवा, तरच हे शेत वाचेल', असे म्हणून गुरूंचा धावा करत अतिशय वेगाने वहाणार्‍या पाण्याला अडवत आरुणी दगडाच्या दोन दरडींदरम्यान झोपून राहिला. सकाळी गेलेला आरुणी रात्र झाली, तरी आला नाही; म्हणून सर्र्वांना काळजी वाटायला लागली. बरीच रात्र झाल्यामुळे सर्वजण आरुणीला शोधायला निघाले. ``आरुणी, अरे बाळ कुठे आहेस तू ?'' गुरूंचा आवाज ऐकून आरुणीने `ओ' दिली. हातातली दिवली उंचावून जवळ जाऊन त्यांनी पाहिले, तर आरुणी पाणी अडवण्यासाठी स्वत:च शेतात बांध होऊन आडवा पडला होता. गुरूंनी सांगितलेली सेवा केलीच पाहिजे, म्हणून तो तसाच पाण्यात आडवा पडून राहिला होता. गुरुजींनी जवळ जाऊन त्याला उठवले. त्याच्या अंगावरून हात फिरवला. पाठीवर आशीर्वादपर हात ठेवत त्यांनी सांगितले, ``मी घेतलेल्या परीक्षेत तू उत्तीर्ण झालास''.

३) गुरुंप्रती किंवा ईश्‍वराप्रती श्रद्धा हवी :-
जाणत्यांनी गुरूंना ईश्‍वरापेक्षाही श्रेष्ठ स्थान दिले आहे; कारण ईश्‍वराची जाणीव गुरूच आपल्याला करून देत असतात.

३) गुरुंप्रती किंवा ईश्‍वराप्रती भाव हवा :-
सुरुवातीला शब्दजन्य माहितीमुळे साधनेवर विश्‍वास बसतो. साधना करता करता अनुभूती येते. या अनुभूतींमुळे ईश्‍वराप्रती श्रद्धा निर्माण होते. या श्रद्धेचे भावात रूपांतर व्हावे लागते. ` भाव तेथे देव, ' असे आपण म्हणतो ना ! भाव निर्मितीसाठी एक सोपा उपाय म्हणजे कोणतीही कृती करण्यापूर्वी ईश्‍वराजवळ प्रार्थना करणे व त्यानुसार आपले वर्तन ठेवणे. आपण दररोज शाळेत आल्यावर प्रार्थना करतोच, त्याचप्रमाणे दररोज ईश्‍वराला प्रार्थना करावी, ` हे ईश्‍वरा, आज माझ्याकडून चांगला अभ्यास होऊ दे व माझ्याकडून चांगली कृती होऊ दे.' भाव कसा असावा, याचे एक संुदर उदाहरण आपण पाहूया :-
समर्थ रामदासस्वामींचा एक शिष्य होता. त्याचे नाव होते ` अज्ञान.' एकदा रामदासस्वामी त्यांच्या काही शिष्यांना बोरबर घेऊन तीर्थयात्रेला निघाले. जातांना त्यांनी आश्रमाची जबाबदारी अज्ञानवर सोपवली. त्याला अशी आज्ञा केली की, रामाला नैवेद्य दाखविल्याशिवाय जेवायचे नाहीस. गुरूंची आज्ञा म्हणून अज्ञानने रामाला नैवेद्य दाखवला; पण राम काही जेवेना. अज्ञानने रामाला सांगितले की, गुरूंची आज्ञा आहे, तू जेवल्याशिवाय जेवू नकोस. त्यामुळे तू जेवेपर्यंत मी काही जेवणार नाही. अज्ञानचा गुरुंप्रती भाव पाहून शेवटी रामाला प्रगट व्हावे लागले. `समर्थ रामदास' यांनी शिवाजी महाराजांना राष्ट्र व धर्म यांच्या रक्षणासाठी वेळोवेळी स्फूर्ती व शक्‍ती दिली. समर्थ रामदासस्वामींनी शिवाजी महाराजांमध्ये जागृत केलेल्या या क्षात्रतेजातूनच ते हिंदवी राज्याची स्थापना करू शकले; परंतु हिंदवी राज्याची स्थापना हे त्यांनी कधीही स्वत:चे कर्तृत्त्व मानले नाही. तर, `हे राज्य व्हावे ही `श्रीं'ची इच्छा आहे', असे ते म्हणत असत. समर्थांनी एकदा त्यांची परीक्षा पहाण्यासाठी त्यांच्याकडे सर्व राज्य मला दे, असे म्हणताच क्षणाचाही विचार न करता राज्य गुरुंचरणी अर्पण केले. आपणही आज गुरुपौर्णिमेच्या मंगलदिनी आपल्या अंगी प्रामाणिकपणा, नम्रता, विनयशीलता, शिस्त, अभ्यासूवृत्ती इत्यादी गुण बाणवून आपले जीवन राष्ट्राचा विकास व उन्नती यांसाठी उपयोगी पडण्यासाठी प्रयत्‍न करू. सर्व गुरू जरी बाह्यत: स्थूलदेहाने निराळे असले, तरी आतून मात्र ते एकच असतात. जसे पाण्याच्या टाकीला लहान मोठे बरेच नळ असले, तरी प्रत्येक नळातून टाकीतीलच पाणी येते किंवा विजेचे दिवे कोणत्याही आकाराचे असले, तरी वाहाणार्‍या विजेमुळे निर्माण होणारा प्रकाशच त्यांतून बाहेर पडतो; अगदी त्याचप्रमाणे गुरु बाह्यत: जरी निरनिराळे दिसले, तरी त्यांच्यातील गुरुतत्व म्हणजेच ईश्‍वरीतत्व (ब्रह्म) एकच असते. मुलांनो, गुरुपौर्णिमा' म्हणजे गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्‍त करण्याचा दिवस. या दिवशी गुरुतत्त्व १००० पटीने कार्यरत असते. यानिमित्त समाजामध्ये अध्यात्माचा परिणामकारक प्रसार केल्यास खर्‍या अर्थाने गुरुसेवा होईल व १००० पटीने कार्यरत असणार्‍या गुरुतत्त्वाचा आपल्यावर वर्षाव होऊन भावजागृती होण्यास मदत होईल. 'देव भावाचा भुकेला' या उक्‍तीनुसार यानिमित्त ईश्‍वराचे सगुण रूप असलेल्या गुरूंच्या चरणी अर्पण केलेला भक्‍ती व भाव हीच खरी `गुरुदक्षिणा' आहे. मुलांनो, आज आपण साधना म्हणजे काय ? व ती कशी करावी याबद्दल, तसेच गुरुंविषयी माहिती, गुरुप्राप्‍तीसाठी शिष्यात आवश्यक असणारे गुण कोणते याविषयी माहिती करून घेतली. परंतु अध्यात्म हे कृतीचे शास्त्र आहे. आजच्या शुभदिनापासून आपण आज ऐकलेला साधनेचा भाग आचरणात आणावा व आजचा विद्यार्थी फक्‍त परिक्षार्थी न रहाता खर्‍या अर्थाने विद्यार्थी व्हावा, हिच श्री गुरूचरणी प्रार्थना ! प.पू. डॉ. आठवले यांना वंदन करुन आजचा विषय येथेच संपवितो.

।। श्री गुरुचरणार्पणमस्तु ।।


।। श्री गुरुचरणार्पणमस्तु ।।


`गुरुपौर्णिमे'च्या निमित्ताने संस्कार प्रश्‍नमंजुषा


नाव * :

इ-मेल :

१. `गुरुपौर्णिमा' या दिवशी असते.

श्रावण पौर्णिमा
आषाढ पौर्णिमा
चैत्र पौर्णिमा


२. गुरुपौर्णिमेला असेही म्हटले जाते.

नारळी पौर्णिमा
व्यासपौर्णिमा
वटपौर्णिमा


३. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्त्व ---- पट कार्यरत असते.

१०००
१००
१०


४. महान ग्रंथरचनेमुळे महर्षी व्यासांना ..... म्हणतात.

परात्पर गुरु
गुरुमाऊली
आदिगुरु


५. आपल्या प्राचीन भारतीय परंपरेनुसार गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्‍त करण्याचा दिवस कोणता ?

बालदिन
शिक्षकदिन
गुरुपौर्णिमा


६. ईश्‍वराचे सगुण रुप कोणते ?

सज्जन
शिष्य
गुरु


७. शिवाजी महाराजांच्या गुरूंचे नाव काय ?

संत नामदेव
समर्थ रामदास
संत एकनाथ


८. सर्व गुरु जरी बाह्यत: स्थूलदेहाने निराळे असले, तरी आतून मात्र ते ------ असतात.

एकच
भिन्न
दयाळू


९. हा शिष्यातील सर्व गुणांचा राजा आहे.

आज्ञाधारकपणा
सेवाभाव
प्रामाणिकपणा


१०. जाहिरातींमधून देवतांची विटंबना करणे, ही ------ आहे.

प्रकृती
संस्कृती
विकृती


११. पुढील शिष्य त्यांच्यातील कोणत्या सद्‌गुणांमुळे गरूंना प्रिय झाले, ते ओळखा.
बाळ आरूणी - शेतातील पाणी अडवण्यासाठी बांधात स्वत: झोपणे

आज्ञापालन
प्रेम
वैराग्य

१२. छत्रपती शिवाजी महाराज - हिंदवी स्वराज्याची स्थापना

संयम
क्षात्रतेज
खरे बोलणे

१३. एकलव्य - द्रोणाचार्यांच्या पुतळयासमोर बसून धनुर्विद्येचे ज्ञानार्चन

शिस्त
संयम
चिकाटी व तळमळ


१४. खाली काही शिष्यांची नावे लिहीली आहेत. शिष्यांच्या नावांपुढे त्यांच्या गुरुंच्या नावांचे पर्याय ओळखा.
संत ज्ञानेश्‍वर

निवृत्तीनाथ
धौम्यऋषी
द्रोणाचार्य

१५. एकलव्य

द्रोणाचार्य
सांदिपनी
मुक्‍ताबाई

१६. श्रीकृष्ण

मुक्‍ताबाई
सांदिपनी
धौम्यऋषी

१७. श्रीराम

सांदिपनी
धौम्यऋषी
वसिष्ठ

१८. स्वामी विवेकानंद

रामकृष्ण परमहंस
वसिष्ठ
नामदेव

१९. चांगदेव

मुक्‍ताबाई
निवृत्तीनाथ
रामचंद्र परमहंस


२०. संतांनी रचना केलेले साहित्य विशिष्ट नावांनी ओळखली जातात. अशाच काही संतांच्या नावासमोर त्यांनी रचना केलेल्या साहित्याची नावे लिहा.

एकनाथ

अभंग
भारुड
केकावली

२१. समर्थ

दासबोध
दोहे
गाथा

२२. मीराबाई

अभंग
दोहे
केकावली

२३. जनाबाई

अभंग
ओव्या
केकावली

२४. संत कबीर

अभंग
केकावली
दोहे

२५. मोरोपंत

अभंग
दोहे
केकावली

२६. तुकाराम

गाथा
दोहे
केकावली

पुढील गोष्ट वाचून खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरे द्या.
प्राचीन काळी एका गावात एक गुरु त्यांच्या दोन शिष्यांना घेऊन त्यांच्या आश्रमात रहात होते. त्यांतील एकाचे नाव होते गोविंद व दुसर्‍याचे नाव होते मुकुंद. काही दिवसानंतर गुरु आपल्या शिष्यांना म्हणाले, `` मी तीर्थयात्रेला जाणार आहे तुम्ही आपल्या आश्रमाची नीट देखभाल करा आणि मी तुम्हाला एक वस्तू देणार आहे ती नीट जपून ठेवा.'' शिष्य `हो' असे म्हणाले. गुरु जातांना दोन्ही शिष्यांना पिशवीत गहू देतात व म्हणतात की, ही वस्तू मी येईपर्यंत नीट जपून ठेवा आणि ते तीर्थयात्रेला जातात. गोविंद पिशवी उघडतो व पहातो, गहू आहेत. तो ते स्वच्छ करतो, वाळवतो व नीट डब्यात भरून ठेवतो. मुकुंद पहातो, गहू आहेत. तो ते गहू शेतात नेतो, पेरतों, नीट मशागत करतो. एक वर्षानंतर गुरु येतात. शिष्यांना विचारतात. मी दिलेली वस्तू कुठे आहे ? गोविंद डबा आणून गुरुंसमोर ठेवतो व म्हणतो, ``गुरुदेव, आपली वस्तू अगदी व्यवस्थित ठेवली आहे. गुरुदेव पहातात, दिलेली वस्तू (गहू) जसेच्यातसे ठेवलेले होते. नंतर ते मुकुंद ला विचारतात, ``माझी वस्तू कुठे आहे, मुकुंद म्हणतो, `चला गुरुदेव, दाखवतो'. तो त्यांना घेऊन शेतांवर जातो. गव्हाने डवरलेली शेते पाहून गुरू आनंदित होतात. त्याला शाबासकी देतात व म्हणतात, ``मी दिलेल्या ज्ञानाचा प्रसार असाच कर, माझे तुला आशीर्वाद आहेत.'' गुरूंचे कार्य म्हणजे `राष्ट्ररक्षण व धर्मप्रसार. `आपल्यालासुध्दा राष्ट्र व धर्म यांचे रक्षण करण्यासाठी ईश्‍वर शक्‍ती व बुध्दी देवो', ही गुरूंचरणी प्रार्थना!

२७. कोणता शिष्य गुरुंना अधिक प्रिय झाला

गुरूंनी दिलेल्‍या ज्ञानाचा प्रसार करणारा - मुकुंद
 गुरूंनी दिलेले ज्ञान स्‍वत:जवळ ठेवणारा - गोविंद
गुरूंनी दिलेली वस्तू स्‍वत:जवळ ठेवणारा

२८. गुरुंनी दिलेल्या वस्तुचे गोविंद या शिष्यानी काय केले ?

गहू नीट जपून ठेवले
गहू पेरले
गहू खाल्‍ले

२९. गुरुंनी दिलेल्या वस्तुचे मुकुंद या शिष्यानी काय केले ?

गहू जसेच्यातसे ठेवले
गहू पेरुन गव्‍हाच्‍या संख्‍येत वाढ केली
गहू खाल्‍ले

३०. या गोष्टीवरून काय बोध घ्याल ?

गुरुंनी दिलेल्‍या ज्ञानाचा प्रसार करणे
गुरुंनी दिलेले ज्ञान स्‍वत:जवळ ठेवणे
गुरूंनी दिलेली वस्तू स्‍वत:जवळ ठेवणे

३१. पूर्वजांचा त्रास दूर करण्यासाठी कोणत्या देवतेचा नामजप करावा?

गणपती
शिव
दत्त

३२. शिवाजी महाराजांच्या पदरी असलेला गुप्‍तहेर कोण ?

जीवा महाला
नेताजी पालकर
बहिर्जी नाईक

३३. शाळेमध्ये देवतांचे विडंबन असलेले नाटक आयोजीत केले जात असल्यास काय कराल ?

त्यात भाग घेऊ
मित्रांना घेऊन बघायला जाऊ
नाटक होऊ नये म्हणून आयोजकांचे प्रबोधन करू

३४. आरती सुरू झाल्यावर कसे उभे रहाल ?

घोळक्याने
सर्वात मागे
शांतपणे व रांगेत

३५. देव, ऋषी, पितर व समाज ही चार ऋणे कोणाला फेडावी लागत नाही

गुरू
शिक्षक
शिष्य

३६. धार्मिक उत्सवाच्यावेळी जबरदस्तीने वर्गणी गोळा करणे, जुगार यांमुळे काय होते ?

धर्महानी
धर्मपालन
धर्मरक्षण

३७. राष्ट्र, धर्म व देवता यांविषयी आदर नसणार्‍याला काय म्हणतात ?

धर्मनिष्ठ
देवभक्‍त
मृतवत्

३८. धर्मासाठी शत्रूचे हाल सहन करून प्रार्णापण करणारा राजा

संभाजी महाराज
शाहू महाराज
टिपू सुलतान

३९. धार्मिक उत्सवात कोणते कार्यक्रम आयोजीत कराल ?

वाद्यवृंद (ऑर्केस्ट्रा)
राष्ट्र व धर्म यांच्याशी निगडीत कार्यक्रम
वेशभूषा स्पर्धा

४०. १८५७ च्या लढ्याच्या वेळी इंग्रजांच्या विरोधात पहिली गोळी कोणी झाडली ?

मंगल पांडे
वासुदेव बळवंत फडके
भगतसिंग